रेणुका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही गेली ३७ वर्षे नातेपुते येथे कार्यरत असुन संस्थेची स्थापना १४ जानेवारी १९८६ रोजी समाजभूषण मुधोजीराव भोजराव तथा नानासाहेब देशमुख यांनी केली. सर्वसामान्यांचे आर्थीक व सामाजिक आयुर्माने उंचावण्याचे ध्येय असल्यामुळे लहान व्यापारी,हातगाडीवाले,हॉटेल व्यावसायिक, शेतीस जोडधंदा म्हणुन म्हैस,संकरीक गाई घेऊन दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी,भूमीहीन शेतमजूर, प्रिंटींग प्रेस इ.अनेक व्यवसायांसाठी संस्थेने कर्जपुरवठा केला.
सन १९८६-८७ साली संस्थेची सभासद संख्या ५०९, भागभांडवल ४९,९५५.००, निधी-५०९.००, ठेवी-३,००,५३१.००, कर्जे-३,९७,४५७.००, गुंतवणुक-६६,०००.००, खेळते भागभांडवल-३,६१,०५०.०० व निव्वळ नफा-४,८९२.०० इतका होता.
सन २०२२-२३ साली संस्थेची सभासद संख्या १०९९, भागभांडवल १,९३,५७,९८१.००, निधी-६०९,७५,९४२.५३, ठेवी-३४,६९,५६,०९४.१७, कर्जे-३६,४४,२८,७७५.६०, गुंतवणुक-८,५२,१४,८१२.००, खेळते भागभांडवल-४६,४८,३६,५५७.६९ व निव्वळ नफा-२९,६५,३४८.७४ इतका आहे व लेखा परिक्षण वर्ग अ आहे. यावरुन संस्थेच्या नेत्रदीपक प्रगतीची कल्पना येते.