संस्थेविषयी

रेणुका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था

रेणुका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही गेली ३७ वर्षे नातेपुते येथे कार्यरत असुन संस्थेची स्थापना १४ जानेवारी १९८६ रोजी समाजभूषण मुधोजीराव भोजराव तथा नानासाहेब देशमुख यांनी केली. सर्वसामान्यांचे आर्थीक व सामाजिक आयुर्माने उंचावण्याचे ध्येय असल्यामुळे लहान व्यापारी,हातगाडीवाले,हॉटेल व्यावसायिक, शेतीस जोडधंदा म्हणुन म्हैस,संकरीक गाई घेऊन दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी,भूमीहीन शेतमजूर, प्रिंटींग प्रेस इ.अनेक व्यवसायांसाठी संस्थेने कर्जपुरवठा केला.

सन १९८६-८७ साली संस्थेची सभासद संख्या ५०९, भागभांडवल ४९,९५५.००, निधी-५०९.००, ठेवी-३,००,५३१.००, कर्जे-३,९७,४५७.००, गुंतवणुक-६६,०००.००, खेळते भागभांडवल-३,६१,०५०.०० व निव्वळ नफा-४,८९२.०० इतका होता.

सन २०२२-२३ साली संस्थेची सभासद संख्या १०९९, भागभांडवल १,९३,५७,९८१.००, निधी-६०९,७५,९४२.५३, ठेवी-३४,६९,५६,०९४.१७, कर्जे-३६,४४,२८,७७५.६०, गुंतवणुक-८,५२,१४,८१२.००, खेळते भागभांडवल-४६,४८,३६,५५७.६९ व निव्वळ नफा-२९,६५,३४८.७४ इतका आहे व लेखा परिक्षण वर्ग अ आहे. यावरुन संस्थेच्या नेत्रदीपक प्रगतीची कल्पना येते.